दिवस तिसरा - गेले दोन दिवस फक्त दोनच किल्ले झाल्यामुळे आज बरीच धावपळ करावी लागणार होती. आजच्या दिवसात जंजिरा मग दिवेआगर, हरिहरेश्वरमार्गे बाणकोट किल्ला करून केळशीला पोचण्याचा बेत होता. त्यामुळे फारसा वेळ न घालवता पटापट आवरून राजापुरीला पोचलो.
इथे बोटवाल्यांची बरीच मनमानी चालते आणि जेमतेम ४५ मिनिटे किल्ल्यात जायला मिळतात. आता जंजिर्यासारखा किल्ला केवळ पाऊण तासात उरकायचा म्हणजे नुसतीच धावाधाव होते, किल्ल्या पाहल्याचे समाधान काय मिळत नाही. पण अजूनतरी याला काहीही पर्याय नाहीये.
मस्त शिडाच्या बोटीत बसून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा माझ्या डिस्कव्हरीच्या कॅपकडे आणि आमच्या कॅमेरा ब्यागांकडे पाहून दोघातिघांनी तुम्ही च्यानेलकडून आलाय का अशी विचारणा करत आमचा भरपूर टाईमपास केला.
जंजिरा किल्ला आहे एकदम जबरदस्त आणि दुरुनही त्याचे दर्शन धडकी भरवणारे आहे. बोटीतून जाताना अगदी जवळ जाऊन ठेपल्याशिवाय त्याचे प्रवेशद्वार मुळीच दिसत नाही. स्थापत्यशास्त्राचा एक अदभुत नमुना हे याचे वर्णन सार्थ आहे.





पाऊण तासात आम्ही फोटोच्या नादात निम्मापण किल्ला पाहू शकणार नाही याची खात्री होती त्यामुळे जास्त शहाणपणा न करता गाईड ठरवला आणि तो सांगत असलेल्या अतिशयोक्त बडबडीकडे फारसे लक्ष न देता महत्वाची ठिकाणे पाहण्याचा सपाटा लावला.
(इथले गाईड इतके हुशार आहेत की ते बोटीतच येतात आणि जातानाच प्रवाशांना घाबरवतात की जर पाऊण तासात तुम्ही परत नाही येऊ शकला तर अडकून पडाल. किल्ला एवढा मोठा आहे की तुम्ही कुठे हरवून बसाल हेच तुम्हाला कळणार नाही. अर्थातच मग सगळेजण गाईड ठरवतात)




गायमुख तोफ

चावरी

आणि इतिहासप्रसिद्ध कलाल बांगडी. या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.






किल्ला पाहून परत आलो आणि कळले की दिघीला जाणारी मोटारलॉँच केवळ दहा मिनिटात सुटणार आहे. आम्ही किल्ल्यात जाताना सॅक आणि हेल्मेट कशाला म्हणून रात्री जिथे उतरलो होतो त्याच रेस्टहाऊसमध्ये सॅक ठेऊन आलो होतो.
मग जिवाच्या आकांताने ते आठ किमी अंतर पार करून सॅक आणि हेल्मेट उचलून कसेबसे वेळेआधी पोचलो.
मग पहिल्यांदा माझी युनिकॉर्न तिच्या सागरी सफरीवर निघाली आणि आम्ही बोटीच्या टपावर प्रस्थान मांडले.



दिघीला पोचल्यावर तिथल्या धक्कयावरच एक ओळखीचे गृहस्थ भेटले. आम्ही जंजिरा करून आलो तेव्हा एकदम त्यांनी पिंक टाकली.
"तिकडे तर मला जायची पण इच्छा होत नाही."
मला वाटले नावाड्यांच्या मनमानीपणाचा राग आला असेल. पण पुढचे वाक्य भारीच होते.
"अहो काय बघणार त्या किल्ल्यात, शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही. फार दुख होते त्यामुळे बघावासाच वाटत नाही. जिथे ते जाऊ शकले नाहीत तिथे आपण कशासाठी जायचे?"
शिवाजी महाराजांबद्दल सर्व आदर ठेऊन सांगतो मला त्यावेळी एकदम हसूच आले. पण गंभीर मोड ऑन ठेऊन बोललो,
"अहो म्हणूनच पहायचा. महाराजांसारख्या धुरंधर माणसालाही जिंकता आला नाही म्हणजे नक्कीच काहीतरी असणार ना विशेष."
पण त्यांना काय ते पटेना, शेवटी मीच माघार घेतली पण जाताजाता पिल्लू सोडून दिले..
"बरोबर आहे, मलाही आता हे ऐकल्यावर जंजिरा आणि शिवनेरीला जायची इच्छा होणार नाही."
त्यावर एकदम बिचकले, शिवनेरीला काय आहे..
"अहो शिवनेरीपण जिंकता आला नव्हता महाराजांना कधी..."
त्यांना चेहर्यावरचा अविश्वास लपवणे कठीण झाले होते.
"अहो असे कसे होईल त्यांचा जन्म झाला होता तिथे".
मग त्यांना थोडक्यात सगळा इतिहास कथन केला. आणि आपत्तीत पडल्यासारखा चेहरा करून ते निघून गेले.
दिघीवरून दिवेआगर आणि श्रीवर्धनला वेळ न घालवता थेट हरिहरेश्वर गाठले. देवळात पटापट दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो. इथून वेळासला जाणारी लॉँच तर भलीमोठी अगदी कार वगैरे घेऊन जाणारी होती. अशा प्रकारे प्रवास करण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे खूप उत्साहात फोटो वगैरे काढले.

पण माझ्या कॅमेराच्या बॅटरीने दगा देण्यास सुरूवात केली होती त्यामुळे इथून पुढे खटाखट फोटो उडवून चालणार नव्हते.
वेळासवरून कमालीचा चढ असेलला रस्ता पार करून बाणकोट किल्ला गाठला. शेवटच्या टप्प्यात तर इतका चढ होता की गाडीवरील वजन कमी करण्यासाठी आम्ही तिथल्याच एका पोलिस चौकीत सॅक ठेवली आणि पुढे गेलो. अर्थातच गाडीने शून्य त्रास दिला आणि माज करत अगदी किल्ल्य्याच्या दारापर्यंत नेऊन बाईक पार्क केली.

बाणकोट किल्ला दिसायला एकदम देखणा आहे पण किल्ल्याचा इतिहास फारसा नाही. तुळोजी आंग्रे पेशव्यांना जुमानेसे झाले तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने त्यांचा पाडाव केला आणि किल्ला इंग्रजांना देऊन टाकला. परंतु, किल्ला फारसा फायद्याचा न ठरल्याने त्यांनी तो पेशव्यांना परत केला.
आता किल्ल्यात काही उरलेले नाही. त्यामुळे भिंतीचे आणि मुख्य दरवाज्याचे फोटो काढण्यावरच समाधान मानावे लागले.










आता मुक्कामाचा टप्पा होता निसर्गसुंदर केळशी. रस्ता विचारत विचारत गावात जेव्हा पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती आणि आमच्या दुर्दैवाने संपूर्ण गावात वीज गायब होती. आदले दिवशी आणि दुपारीसुद्धा मजबूत पाऊस झाल्याचे जाणवत होते. त्या अंधारात पाखाडीवरून गाडी चालवत विद्वांस यांचे घर शोधणे हा एक दिव्य प्रकार होता. बर गावात एकही मोबाईल टॉवर नाही त्यामुळे फोनवर कोणाला विचारावे तर तेही शक्य नाही.
लाईट नसल्याने काही जण बाहेरच वारा खात बसले होते त्यांना विचारत विचारत शेवटी घर सापडले. त्यांच्या समोरून किल्ली हस्तगत केली आणि दार उघडले तोच दोन वटवाघळे एकदम उडून गेली.
बापरे ईतका दचकलो. ते घर अनेक महिन्यांपासून वापरात नाही. त्यामुळे आत काय असेल याची कल्पना करवेना. आधी बॅटरीच्या उजेडात कुठे काय साप-किरडू वगैरे नाही ना याची खात्री केली. तरीपण तिथे अंधारात बसण्याचे धाडस होईना. जेवायला अजून वेळ होता त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जायचा प्लॅन आखला. अंधारात गुढगाभर पाण्यात जाऊन उभारलो तरी लाटांचा पत्ता नाही, नुसताच आवाज.
त्यामुळे इतके विचित्र फिलींग येत होते. नंतर उलगडा झाला की भरतीच्या वेळी आलेल्या पाण्यामुळे भरलेल्या एका खोलगट भागात उभे होतो. मग अजून थोडे आत जाऊन लाटा अनुभवल्या. त्या अंधाऱ्या रात्रीचा समुद्रकिनारा एकदमच वेगळा वाटला. एकतर सगळीकडे मिट्ट काळोख, त्या निर्मनुष्य किनाऱ्यावर आम्ही दोघेच, लाटांचा आवाज सोडला तर एकदम नीरव शांतता आणि किनाऱ्याच्या बाजून असेलेली गर्द वृक्षराई...
देवाशपथ सांगतो...एका अनामक भितीचा शहारा उमटून गेला मनात. तिथे घाबरण्यासारखे काहीच नव्हते पण कुठल्यातरी अनामिक भितीने उगाचाच थोडे घाबरल्यासारखे झाले. बराच वेळ असा टाईमपास करून गावात परतलो तरी लाईट येण्याचा काही पत्ता नाही.
शेवटी अंधारातच एक घरगुती खानावळ शोधून काढली. आत जाऊन बसलो तर समोरच दोन माणसे छानपैकी झोपलेली आणि त्या बाईने आम्हाला तिथेच बसा म्हणून ताटं मांडली. आता समोर अशी माणसे झोपलेली असताना मला खायला काहीतरीच वाटायला लागले. ते त्या बाईला जाणवले असावे
"ते रिक्षा चालवतात, माझा मुलगा आणि त्याचे वडील..आज लांबचे भाडे घेतले म्हणून दमून झोपलेत. तुम्ही जेवा निवांत."
जेवण अगदी आटोपशीरच होते. गरमा-गरम पोळ्या, फ्लॉवर बटाटा रस्सा, चटणी आणि नंतर आमटी भात. पण एकतर कडकडून भूक लागलेली आणि अन्नाला एक सुरेखच चव होती. त्यामुळे पुन्हा एकदा 'भस्म्या मोड'मध्ये गेलो. त्या काकू वाढतच राहील्या आणि आम्ही काय थांबा म्हणायचे नावच घेत नव्हतो. तो भातदेखील इतका स्वादिष्ट होता की पहिल्यांदा एवढा भाताचा डोंगर संपवला असेल.
आता इतके जेवण झाल्यावर निद्रेचा अंमल चढायला सुरूवात झालीच होती. जाताना तीन-चार मेणबत्त्या घेतल्या कारण लाईट अजूनही आलेच नव्हते. घरी जाऊन सगळ्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात पुन्हा एकदा सगळी खोली तपासली आणि मगच निद्रादेवीला शरण गेलो.
इथे बोटवाल्यांची बरीच मनमानी चालते आणि जेमतेम ४५ मिनिटे किल्ल्यात जायला मिळतात. आता जंजिर्यासारखा किल्ला केवळ पाऊण तासात उरकायचा म्हणजे नुसतीच धावाधाव होते, किल्ल्या पाहल्याचे समाधान काय मिळत नाही. पण अजूनतरी याला काहीही पर्याय नाहीये.
मस्त शिडाच्या बोटीत बसून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा माझ्या डिस्कव्हरीच्या कॅपकडे आणि आमच्या कॅमेरा ब्यागांकडे पाहून दोघातिघांनी तुम्ही च्यानेलकडून आलाय का अशी विचारणा करत आमचा भरपूर टाईमपास केला.
जंजिरा किल्ला आहे एकदम जबरदस्त आणि दुरुनही त्याचे दर्शन धडकी भरवणारे आहे. बोटीतून जाताना अगदी जवळ जाऊन ठेपल्याशिवाय त्याचे प्रवेशद्वार मुळीच दिसत नाही. स्थापत्यशास्त्राचा एक अदभुत नमुना हे याचे वर्णन सार्थ आहे.





पाऊण तासात आम्ही फोटोच्या नादात निम्मापण किल्ला पाहू शकणार नाही याची खात्री होती त्यामुळे जास्त शहाणपणा न करता गाईड ठरवला आणि तो सांगत असलेल्या अतिशयोक्त बडबडीकडे फारसे लक्ष न देता महत्वाची ठिकाणे पाहण्याचा सपाटा लावला.
(इथले गाईड इतके हुशार आहेत की ते बोटीतच येतात आणि जातानाच प्रवाशांना घाबरवतात की जर पाऊण तासात तुम्ही परत नाही येऊ शकला तर अडकून पडाल. किल्ला एवढा मोठा आहे की तुम्ही कुठे हरवून बसाल हेच तुम्हाला कळणार नाही. अर्थातच मग सगळेजण गाईड ठरवतात)




गायमुख तोफ

चावरी

आणि इतिहासप्रसिद्ध कलाल बांगडी. या तोफेचा पल्ला १२किमी पर्यंत आहे असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. एक आख्याईका अशी की, पेशव्यांनी किल्ला जिंकण्यासाठी ही तोफ आणवली होती पण किल्ला जिंकता न आल्याने निराश होऊन त्यांनी ती तशीच सोडून दिली. तिच पुढे सिद्दीने किल्ल्यात आणवली. तर काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली.






किल्ला पाहून परत आलो आणि कळले की दिघीला जाणारी मोटारलॉँच केवळ दहा मिनिटात सुटणार आहे. आम्ही किल्ल्यात जाताना सॅक आणि हेल्मेट कशाला म्हणून रात्री जिथे उतरलो होतो त्याच रेस्टहाऊसमध्ये सॅक ठेऊन आलो होतो.
मग जिवाच्या आकांताने ते आठ किमी अंतर पार करून सॅक आणि हेल्मेट उचलून कसेबसे वेळेआधी पोचलो.
मग पहिल्यांदा माझी युनिकॉर्न तिच्या सागरी सफरीवर निघाली आणि आम्ही बोटीच्या टपावर प्रस्थान मांडले.



दिघीला पोचल्यावर तिथल्या धक्कयावरच एक ओळखीचे गृहस्थ भेटले. आम्ही जंजिरा करून आलो तेव्हा एकदम त्यांनी पिंक टाकली.
"तिकडे तर मला जायची पण इच्छा होत नाही."
मला वाटले नावाड्यांच्या मनमानीपणाचा राग आला असेल. पण पुढचे वाक्य भारीच होते.
"अहो काय बघणार त्या किल्ल्यात, शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही. फार दुख होते त्यामुळे बघावासाच वाटत नाही. जिथे ते जाऊ शकले नाहीत तिथे आपण कशासाठी जायचे?"
शिवाजी महाराजांबद्दल सर्व आदर ठेऊन सांगतो मला त्यावेळी एकदम हसूच आले. पण गंभीर मोड ऑन ठेऊन बोललो,
"अहो म्हणूनच पहायचा. महाराजांसारख्या धुरंधर माणसालाही जिंकता आला नाही म्हणजे नक्कीच काहीतरी असणार ना विशेष."
पण त्यांना काय ते पटेना, शेवटी मीच माघार घेतली पण जाताजाता पिल्लू सोडून दिले..
"बरोबर आहे, मलाही आता हे ऐकल्यावर जंजिरा आणि शिवनेरीला जायची इच्छा होणार नाही."
त्यावर एकदम बिचकले, शिवनेरीला काय आहे..
"अहो शिवनेरीपण जिंकता आला नव्हता महाराजांना कधी..."
त्यांना चेहर्यावरचा अविश्वास लपवणे कठीण झाले होते.
"अहो असे कसे होईल त्यांचा जन्म झाला होता तिथे".
मग त्यांना थोडक्यात सगळा इतिहास कथन केला. आणि आपत्तीत पडल्यासारखा चेहरा करून ते निघून गेले.

दिघीवरून दिवेआगर आणि श्रीवर्धनला वेळ न घालवता थेट हरिहरेश्वर गाठले. देवळात पटापट दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो. इथून वेळासला जाणारी लॉँच तर भलीमोठी अगदी कार वगैरे घेऊन जाणारी होती. अशा प्रकारे प्रवास करण्याचा आमचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे खूप उत्साहात फोटो वगैरे काढले.

पण माझ्या कॅमेराच्या बॅटरीने दगा देण्यास सुरूवात केली होती त्यामुळे इथून पुढे खटाखट फोटो उडवून चालणार नव्हते.
वेळासवरून कमालीचा चढ असेलला रस्ता पार करून बाणकोट किल्ला गाठला. शेवटच्या टप्प्यात तर इतका चढ होता की गाडीवरील वजन कमी करण्यासाठी आम्ही तिथल्याच एका पोलिस चौकीत सॅक ठेवली आणि पुढे गेलो. अर्थातच गाडीने शून्य त्रास दिला आणि माज करत अगदी किल्ल्य्याच्या दारापर्यंत नेऊन बाईक पार्क केली.

बाणकोट किल्ला दिसायला एकदम देखणा आहे पण किल्ल्याचा इतिहास फारसा नाही. तुळोजी आंग्रे पेशव्यांना जुमानेसे झाले तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने त्यांचा पाडाव केला आणि किल्ला इंग्रजांना देऊन टाकला. परंतु, किल्ला फारसा फायद्याचा न ठरल्याने त्यांनी तो पेशव्यांना परत केला.
आता किल्ल्यात काही उरलेले नाही. त्यामुळे भिंतीचे आणि मुख्य दरवाज्याचे फोटो काढण्यावरच समाधान मानावे लागले.










आता मुक्कामाचा टप्पा होता निसर्गसुंदर केळशी. रस्ता विचारत विचारत गावात जेव्हा पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती आणि आमच्या दुर्दैवाने संपूर्ण गावात वीज गायब होती. आदले दिवशी आणि दुपारीसुद्धा मजबूत पाऊस झाल्याचे जाणवत होते. त्या अंधारात पाखाडीवरून गाडी चालवत विद्वांस यांचे घर शोधणे हा एक दिव्य प्रकार होता. बर गावात एकही मोबाईल टॉवर नाही त्यामुळे फोनवर कोणाला विचारावे तर तेही शक्य नाही.
लाईट नसल्याने काही जण बाहेरच वारा खात बसले होते त्यांना विचारत विचारत शेवटी घर सापडले. त्यांच्या समोरून किल्ली हस्तगत केली आणि दार उघडले तोच दोन वटवाघळे एकदम उडून गेली.
बापरे ईतका दचकलो. ते घर अनेक महिन्यांपासून वापरात नाही. त्यामुळे आत काय असेल याची कल्पना करवेना. आधी बॅटरीच्या उजेडात कुठे काय साप-किरडू वगैरे नाही ना याची खात्री केली. तरीपण तिथे अंधारात बसण्याचे धाडस होईना. जेवायला अजून वेळ होता त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर जायचा प्लॅन आखला. अंधारात गुढगाभर पाण्यात जाऊन उभारलो तरी लाटांचा पत्ता नाही, नुसताच आवाज.
त्यामुळे इतके विचित्र फिलींग येत होते. नंतर उलगडा झाला की भरतीच्या वेळी आलेल्या पाण्यामुळे भरलेल्या एका खोलगट भागात उभे होतो. मग अजून थोडे आत जाऊन लाटा अनुभवल्या. त्या अंधाऱ्या रात्रीचा समुद्रकिनारा एकदमच वेगळा वाटला. एकतर सगळीकडे मिट्ट काळोख, त्या निर्मनुष्य किनाऱ्यावर आम्ही दोघेच, लाटांचा आवाज सोडला तर एकदम नीरव शांतता आणि किनाऱ्याच्या बाजून असेलेली गर्द वृक्षराई...
देवाशपथ सांगतो...एका अनामक भितीचा शहारा उमटून गेला मनात. तिथे घाबरण्यासारखे काहीच नव्हते पण कुठल्यातरी अनामिक भितीने उगाचाच थोडे घाबरल्यासारखे झाले. बराच वेळ असा टाईमपास करून गावात परतलो तरी लाईट येण्याचा काही पत्ता नाही.
शेवटी अंधारातच एक घरगुती खानावळ शोधून काढली. आत जाऊन बसलो तर समोरच दोन माणसे छानपैकी झोपलेली आणि त्या बाईने आम्हाला तिथेच बसा म्हणून ताटं मांडली. आता समोर अशी माणसे झोपलेली असताना मला खायला काहीतरीच वाटायला लागले. ते त्या बाईला जाणवले असावे
"ते रिक्षा चालवतात, माझा मुलगा आणि त्याचे वडील..आज लांबचे भाडे घेतले म्हणून दमून झोपलेत. तुम्ही जेवा निवांत."
जेवण अगदी आटोपशीरच होते. गरमा-गरम पोळ्या, फ्लॉवर बटाटा रस्सा, चटणी आणि नंतर आमटी भात. पण एकतर कडकडून भूक लागलेली आणि अन्नाला एक सुरेखच चव होती. त्यामुळे पुन्हा एकदा 'भस्म्या मोड'मध्ये गेलो. त्या काकू वाढतच राहील्या आणि आम्ही काय थांबा म्हणायचे नावच घेत नव्हतो. तो भातदेखील इतका स्वादिष्ट होता की पहिल्यांदा एवढा भाताचा डोंगर संपवला असेल.
आता इतके जेवण झाल्यावर निद्रेचा अंमल चढायला सुरूवात झालीच होती. जाताना तीन-चार मेणबत्त्या घेतल्या कारण लाईट अजूनही आलेच नव्हते. घरी जाऊन सगळ्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात पुन्हा एकदा सगळी खोली तपासली आणि मगच निद्रादेवीला शरण गेलो.
No comments:
Post a Comment