प्रास्ताविक...गेल्या आठवड्यात मी आणि माझा मामेभाऊ कोकणात बाईक भ्रमंती करून आलो....सागरी किल्ले पाहणे हे प्रमुख उद्दीष्ट असल्याने आम्ही बाकी अनेक निसर्गरम्य ठिकाणांपाशी जास्त काळ थांबलो नाही...
अलीबागपासून सुरूवात करून ते गणपतीपुळ्याजवळील जयगडपर्यंत असे एकूण ११ किल्ले या भ्रमंतीत पाहिले...
(त्यातील निवडक किल्लेच आता उरले आहेत. बाकिचे केवळ अवशेष आणि तेही शोधून काढावे लागतात...असो)
पुणे ते पुणे असे एकूण ९५० किमी ची भ्रमंती झाली....आणि माझ्या होंडा युनिकॉर्नने या सफरीत मोलाची साथ दिली...आमच्या दोघांचे आणि सामानाचे असे जवळपास १६० कि. चे वजन सहजी पेलून गाडीने कोकणातल्या तीव्र चढ उतारांवर अजिबात त्रास दिला नाही...आणि येताना सातारा-पुणे महामार्गावर तर तब्बल ११५किमी च्या वेगाने पळवली....
दिवस पहिला....
भल्या पहाटे जेव्हा पुण्याहून जर्कीन, ग्लोव्हज, हेल्मेट परिधान करून अलिबागच्या दिशेने सुटलो तेव्हा हवेत एक सुखद गारवा होता..सूर्यमहारांजाचे आगमन व्हायचे होते आणि हायवेवर रहदारीही फारशी नव्हती....
त्या संधीचा फायदा घेऊन जे बाईक सुसाट पळवली ती थेट लोणावळ्यापर्यंत...घड्याळात पाहिले तर जेमतेम एका तास झाला होता.
मग तिथल्याच आमच्या फेवरिट 'अन्नपूर्णा' हॉटेलमधून भरपेट नाष्टा करून आगेकूच केली. आता उकाडाही वाढत चालला होता आणि रहदारीही...पण गाडीचा वेग कमी करावा लागला नाही आणि पेण मार्गे अलिबागजवळ येऊन ठेपलोही...तिथे जातानाच आम्हाला 'थळ ८ किमी' असा बोर्ड दिसला...थळजवळ खांदेरी-उंदेरी किल्ले आहेत माहीती होते पण ते आमच्या वेळापत्रकात नव्हते..पण फक्त आठ किमी अंतर असेल तर दोन किल्ले पदरात पडतील या हिशोबाने गाडी तिकडे वळवली...
हे दोन्ही किल्ले समुद्रात आतवर असल्याने बोटीनेच जावे लागते. पण फारसे पर्यटक इथे येत नाहीत त्यामुळे नावाडी ठरवून त्यानुसार जावे लागते. त्यामुळे थळपाशी जाताच आम्ही नावाडी शोध मोहीम हातात घेतली. सुदैवाने एक अविनाश बोचके म्हणून नंबर मिळाला. त्याला फोन लावल्यानंतर त्याने विचारणा केली..आम्ही दोघेच आहोत म्हणल्यावर त्याने डायरेक्ट १०००रु मागितले...
मग घासाघिस सुरू...नाय होय म्हणता ५०० रुपयांवर सौदा तुटला...
"मी आत्ता एका ग्रुपला घेऊन किल्ल्यात गेलो आहे..तासाभरात येतो..."
मग तिथल्याच किनार्यावर गेलो आणि सुकट मासळीचा दर्प नाकात घुसला..बापरे...
अगदी असह्य वास होता तो. इथून पुढे याच वासाची सवय करावी लागणार आहे असे म्हणत तिथेच ठाण मांडले...
दरम्यान, जवळच्या एका घरापाशी बाईक लावली. तिथली एक षोडषवर्षा आम्हाला पाहून पुढे आली. मग सगळे पुराण ऐकवले. आम्ही दोघेच असे बाईकवरून आलो म्हणल्यावर ती अगदीच प्रभावित झाली. मग सामान आणि हेल्मेट ठेवण्यासाठी एक खोली उघडून दिली. बोट कुठे थांबते हे नुसते रस्ता दाखवून थांबली नाही तर टळटळीत उन्हात आमच्याबरोबर चालत आली आणि वर एवढ्या उन्हात बसण्यापेक्षा घरीच बसा असे अधिकाराने सांगितलेही..
(माझे पिकलेले केस आणि सुटलेले पोट पाहून माझ्यापेक्षा अमेयकडेच जास्त तिचा ओढा असावा असा माझा अंदाज )
मग तिथल्याच कोळ्यांच्या पोरांबरोबर क्रिकेट खेळत वेळ काढला.
एकाचे दोन तास झाले तरी या माणसाचा पत्ता नाही. फोन करतोय तर उचलायला तयार नाही..
दरम्यान, अजून एक जण पुढे येऊन ठाकला.
"कुठं जायचं, किल्ल्यात?"
"हो, त्या अविनाश बोचकेंबरोबर चाललोय"
"मी पण घेऊन जातो की, ५०० रुपये लागतील"
"अहो पाचशेमध्ये तर बोचके घेऊन चाललेत, तुम्ही ४०० मध्ये नेणार का?"
"चला नेतो."
आम्ही वेळ आणि शंभर रुपडे वाचल्याच्या उत्साहात निघालो तर ती मस्यकन्या वेळेवर धावली..
"अहो जाऊ नका त्याच्याबरोबर, तो दारूडा आहे, किल्यात सोडून पळून जाईल.".
आणि एवढ्यावर ती थांबली नाही, तिने त्याला जाम शिव्या-बिव्या घालत हाकलून दिले.
बापरे, हे कायतरी भयंकरच होते.
शेवटी अडीच एक तासांनंतर तो बोचके उगवला. आम्ही भराभर कॅमेरे उचलून निघालो तर थंड स्वरात म्हणाला..
"अहो आपले अजून हिशोबाचे बोलणे झाले नाही.."
मला काय टोटलच लागेना. आता परत कसले हिशोबाचे बोलणे..
"पाचशेत परवडत नाय आम्हाला, हजार रुपये लागतील.."
आता माझे टाळके सणकले..आणि जो मी पट्टा सोडला..
"मग हे आधी बोलणे झाले तेव्हा काय कान वाजले होते का. तेव्हा कशाला म्हणाला पाचशेत सोडतो. आणि आता अडीच तास थांबायला लाऊन निर्लज्जपणे सांगतोय. आम्ही काय &*^% म्हणून थांबलो का? किल्ला काय तुझ्या %^&^% का च्यायला, अशी लूटमार करता का तुम्ही. नव्हते परवडत तर तेव्हाच थोबाड उचकटून बोलायचे..इइ. "
एवढे बोलल्यानंतर मला वाटले आता "तुझ्या आवशीचा." पासून सुरुवात होणार. पण काय नाय त्याने थंडपणे माशांची जाळी उचलली आणि चालता झाला.
माझा संताप अजूनही कमी झालेला नव्हता आणि मी त्याच्या मागोमाग तणतणत गाड्यांपाशी आलो. तरीही काहीही फरक नाही.
उद्विग्न मनाने गाडी काढली आणि अलिबागकडे सुटलो. ती मस्यकन्यापण कुठे गायब झाली होती देव जाणे.
आपण मूर्ख बनवलो गेल्याची भावना त्रस्त करत होती आणि अनेक हिंसक विचार मनात येत होते.
थोडक्या वेळातच अलिबागपाशी पोचलो...
अलीबागपासून कुलाबा किल्ला अगदी जवळ आहे आणि ओहोटी असेल तर किल्ल्यात चालत पण जाता येते.
असा अंदाज होता की ओहोटीची वेळ साधून चालत जाता येईल पण गेल्यानंतर कळाले की ओहोटीची वेळ टळून गेली त्यामुळे झक मारत प्रत्येकी ८० रुपये भरून बोट केली. पण किल्ल्यात गेल्यानंतर मात्र दिवसभरच्या श्रमाचे सार्थक झाले.
अतिशय देखणा किल्ला आहे.. १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला वसवला. त्यानंतर मायनाक भंडारी या पहिल्या दर्यासारंगाने किल्ला झुंजता ठेवला. असे म्हणतात की किनाऱ्यावरील तोफांचा मारा प्रवेशद्वारावर होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी सर्जेकोट बांधला. हा एक छोटेखानी किल्लाच आहे.
सर्जेकोट किल्ला..यालाच किल्ल्याचा सतरावा बुरूज असेपण म्हणतात..
कुलाबा किल्ला आता पुरातत्व खात्याच्या अधिकारात आहे आणि किरकोळ प्रवेशमूल्य आकारले जाते.
हा किल्ला नंतर कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख केंद्र बनला. परकीयांवर दरारा बसविणाऱया मराठमोळ्या गुराबा बोटी देखील इथे बांधल्या जात अशी माहीती मिळाली. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या आणि यशस्वीपणे तोंड दिले. परंतु अखेर वंशकलहात त्याची वाताहात झाली आणि वारस नसल्याचे दाखवत इंग्रजांनी किल्ला बळकावला.
सिद्धिविनायक मंदीर
या मंदिरात गणेशमूर्तीबरोबर सूर्य आणि इतरही देवतांच्या मूर्त्या आहेत. त्यामुळे याला गणेश पंचायतन म्हणून ओळखले जाते आणि चतुर्थीला इथे प्रचंड गर्दी होते.
किल्ल्यावरून जाणारे एक हेलीकॉप्टर
दर्या दरवाजा
त्यानंतर परत अलिबागला आल्यावर किल्ल्याच्या बॅक़ड्रॉपला सुंदर असा सूर्यास्ताचा देखावाही मिळाला.
पर्यटकांची बेसुमार गर्दी नसती तर तो अजून सुंदर वाटला असता...
असो, तिथून पुढचे ठिकाण होते कोर्लईचा किल्ला..त्यासाठी अंधार पडला तरी रेवदंड्याला पोचणे भाग होते. मग त्या खडबडीत रस्त्यावरून जेव्हा रेवदंड्याला पोहोचलो तेव्हा जाणवले की सकाळी आठ वाजता केलेल्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नाही.
मग तिथल्याच एका खानावळीत घुसलो. आधी थाळी संपवली मग एक्सट्रा चपात्या, भाजी असे भस्म्या झाल्यासारखे खात सुटलो. शेवटी ती बाई येऊन म्हणाली
"बाळा भाजी संपली.."
"अजून काय आहे का खायला..?"
रस्स्यात घालायचे टॉमॅटो आहेत फक्त
"चालतील द्या.."
मग त्या टोमॅटोंवर तिने फोडणी घालून भाजी म्हणून दिली.
नंतर पोळ्यापण संपल्या.
"भात आहे ना..आणा तोच"
शेवटी भातपण संपला तेव्हा मात्र उठलो..आणि अत्यंत जडावलेल्या शरीराने एका घरगुती गेस्टहाऊसमध्ये अंग टाकून दिले....
क्रमश...
अलीबागपासून सुरूवात करून ते गणपतीपुळ्याजवळील जयगडपर्यंत असे एकूण ११ किल्ले या भ्रमंतीत पाहिले...
(त्यातील निवडक किल्लेच आता उरले आहेत. बाकिचे केवळ अवशेष आणि तेही शोधून काढावे लागतात...असो)
पुणे ते पुणे असे एकूण ९५० किमी ची भ्रमंती झाली....आणि माझ्या होंडा युनिकॉर्नने या सफरीत मोलाची साथ दिली...आमच्या दोघांचे आणि सामानाचे असे जवळपास १६० कि. चे वजन सहजी पेलून गाडीने कोकणातल्या तीव्र चढ उतारांवर अजिबात त्रास दिला नाही...आणि येताना सातारा-पुणे महामार्गावर तर तब्बल ११५किमी च्या वेगाने पळवली....
दिवस पहिला....
भल्या पहाटे जेव्हा पुण्याहून जर्कीन, ग्लोव्हज, हेल्मेट परिधान करून अलिबागच्या दिशेने सुटलो तेव्हा हवेत एक सुखद गारवा होता..सूर्यमहारांजाचे आगमन व्हायचे होते आणि हायवेवर रहदारीही फारशी नव्हती....
त्या संधीचा फायदा घेऊन जे बाईक सुसाट पळवली ती थेट लोणावळ्यापर्यंत...घड्याळात पाहिले तर जेमतेम एका तास झाला होता.
मग तिथल्याच आमच्या फेवरिट 'अन्नपूर्णा' हॉटेलमधून भरपेट नाष्टा करून आगेकूच केली. आता उकाडाही वाढत चालला होता आणि रहदारीही...पण गाडीचा वेग कमी करावा लागला नाही आणि पेण मार्गे अलिबागजवळ येऊन ठेपलोही...तिथे जातानाच आम्हाला 'थळ ८ किमी' असा बोर्ड दिसला...थळजवळ खांदेरी-उंदेरी किल्ले आहेत माहीती होते पण ते आमच्या वेळापत्रकात नव्हते..पण फक्त आठ किमी अंतर असेल तर दोन किल्ले पदरात पडतील या हिशोबाने गाडी तिकडे वळवली...
हे दोन्ही किल्ले समुद्रात आतवर असल्याने बोटीनेच जावे लागते. पण फारसे पर्यटक इथे येत नाहीत त्यामुळे नावाडी ठरवून त्यानुसार जावे लागते. त्यामुळे थळपाशी जाताच आम्ही नावाडी शोध मोहीम हातात घेतली. सुदैवाने एक अविनाश बोचके म्हणून नंबर मिळाला. त्याला फोन लावल्यानंतर त्याने विचारणा केली..आम्ही दोघेच आहोत म्हणल्यावर त्याने डायरेक्ट १०००रु मागितले...
मग घासाघिस सुरू...नाय होय म्हणता ५०० रुपयांवर सौदा तुटला...
"मी आत्ता एका ग्रुपला घेऊन किल्ल्यात गेलो आहे..तासाभरात येतो..."
मग तिथल्याच किनार्यावर गेलो आणि सुकट मासळीचा दर्प नाकात घुसला..बापरे...
अगदी असह्य वास होता तो. इथून पुढे याच वासाची सवय करावी लागणार आहे असे म्हणत तिथेच ठाण मांडले...
दरम्यान, जवळच्या एका घरापाशी बाईक लावली. तिथली एक षोडषवर्षा आम्हाला पाहून पुढे आली. मग सगळे पुराण ऐकवले. आम्ही दोघेच असे बाईकवरून आलो म्हणल्यावर ती अगदीच प्रभावित झाली. मग सामान आणि हेल्मेट ठेवण्यासाठी एक खोली उघडून दिली. बोट कुठे थांबते हे नुसते रस्ता दाखवून थांबली नाही तर टळटळीत उन्हात आमच्याबरोबर चालत आली आणि वर एवढ्या उन्हात बसण्यापेक्षा घरीच बसा असे अधिकाराने सांगितलेही..
(माझे पिकलेले केस आणि सुटलेले पोट पाहून माझ्यापेक्षा अमेयकडेच जास्त तिचा ओढा असावा असा माझा अंदाज )
मग तिथल्याच कोळ्यांच्या पोरांबरोबर क्रिकेट खेळत वेळ काढला.
एकाचे दोन तास झाले तरी या माणसाचा पत्ता नाही. फोन करतोय तर उचलायला तयार नाही..
दरम्यान, अजून एक जण पुढे येऊन ठाकला.
"कुठं जायचं, किल्ल्यात?"
"हो, त्या अविनाश बोचकेंबरोबर चाललोय"
"मी पण घेऊन जातो की, ५०० रुपये लागतील"
"अहो पाचशेमध्ये तर बोचके घेऊन चाललेत, तुम्ही ४०० मध्ये नेणार का?"
"चला नेतो."
आम्ही वेळ आणि शंभर रुपडे वाचल्याच्या उत्साहात निघालो तर ती मस्यकन्या वेळेवर धावली..
"अहो जाऊ नका त्याच्याबरोबर, तो दारूडा आहे, किल्यात सोडून पळून जाईल.".
आणि एवढ्यावर ती थांबली नाही, तिने त्याला जाम शिव्या-बिव्या घालत हाकलून दिले.
बापरे, हे कायतरी भयंकरच होते.
शेवटी अडीच एक तासांनंतर तो बोचके उगवला. आम्ही भराभर कॅमेरे उचलून निघालो तर थंड स्वरात म्हणाला..
"अहो आपले अजून हिशोबाचे बोलणे झाले नाही.."
मला काय टोटलच लागेना. आता परत कसले हिशोबाचे बोलणे..
"पाचशेत परवडत नाय आम्हाला, हजार रुपये लागतील.."
आता माझे टाळके सणकले..आणि जो मी पट्टा सोडला..
"मग हे आधी बोलणे झाले तेव्हा काय कान वाजले होते का. तेव्हा कशाला म्हणाला पाचशेत सोडतो. आणि आता अडीच तास थांबायला लाऊन निर्लज्जपणे सांगतोय. आम्ही काय &*^% म्हणून थांबलो का? किल्ला काय तुझ्या %^&^% का च्यायला, अशी लूटमार करता का तुम्ही. नव्हते परवडत तर तेव्हाच थोबाड उचकटून बोलायचे..इइ. "
एवढे बोलल्यानंतर मला वाटले आता "तुझ्या आवशीचा." पासून सुरुवात होणार. पण काय नाय त्याने थंडपणे माशांची जाळी उचलली आणि चालता झाला.
माझा संताप अजूनही कमी झालेला नव्हता आणि मी त्याच्या मागोमाग तणतणत गाड्यांपाशी आलो. तरीही काहीही फरक नाही.
उद्विग्न मनाने गाडी काढली आणि अलिबागकडे सुटलो. ती मस्यकन्यापण कुठे गायब झाली होती देव जाणे.
आपण मूर्ख बनवलो गेल्याची भावना त्रस्त करत होती आणि अनेक हिंसक विचार मनात येत होते.
थोडक्या वेळातच अलिबागपाशी पोचलो...
अलीबागपासून कुलाबा किल्ला अगदी जवळ आहे आणि ओहोटी असेल तर किल्ल्यात चालत पण जाता येते.
असा अंदाज होता की ओहोटीची वेळ साधून चालत जाता येईल पण गेल्यानंतर कळाले की ओहोटीची वेळ टळून गेली त्यामुळे झक मारत प्रत्येकी ८० रुपये भरून बोट केली. पण किल्ल्यात गेल्यानंतर मात्र दिवसभरच्या श्रमाचे सार्थक झाले.
अतिशय देखणा किल्ला आहे.. १६८० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला वसवला. त्यानंतर मायनाक भंडारी या पहिल्या दर्यासारंगाने किल्ला झुंजता ठेवला. असे म्हणतात की किनाऱ्यावरील तोफांचा मारा प्रवेशद्वारावर होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी सर्जेकोट बांधला. हा एक छोटेखानी किल्लाच आहे.
सर्जेकोट किल्ला..यालाच किल्ल्याचा सतरावा बुरूज असेपण म्हणतात..
कुलाबा किल्ला आता पुरातत्व खात्याच्या अधिकारात आहे आणि किरकोळ प्रवेशमूल्य आकारले जाते.
हा किल्ला नंतर कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख केंद्र बनला. परकीयांवर दरारा बसविणाऱया मराठमोळ्या गुराबा बोटी देखील इथे बांधल्या जात अशी माहीती मिळाली. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या आणि यशस्वीपणे तोंड दिले. परंतु अखेर वंशकलहात त्याची वाताहात झाली आणि वारस नसल्याचे दाखवत इंग्रजांनी किल्ला बळकावला.
सिद्धिविनायक मंदीर
या मंदिरात गणेशमूर्तीबरोबर सूर्य आणि इतरही देवतांच्या मूर्त्या आहेत. त्यामुळे याला गणेश पंचायतन म्हणून ओळखले जाते आणि चतुर्थीला इथे प्रचंड गर्दी होते.
किल्ल्यावरून जाणारे एक हेलीकॉप्टर
दर्या दरवाजा
त्यानंतर परत अलिबागला आल्यावर किल्ल्याच्या बॅक़ड्रॉपला सुंदर असा सूर्यास्ताचा देखावाही मिळाला.
पर्यटकांची बेसुमार गर्दी नसती तर तो अजून सुंदर वाटला असता...
असो, तिथून पुढचे ठिकाण होते कोर्लईचा किल्ला..त्यासाठी अंधार पडला तरी रेवदंड्याला पोचणे भाग होते. मग त्या खडबडीत रस्त्यावरून जेव्हा रेवदंड्याला पोहोचलो तेव्हा जाणवले की सकाळी आठ वाजता केलेल्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नाही.
मग तिथल्याच एका खानावळीत घुसलो. आधी थाळी संपवली मग एक्सट्रा चपात्या, भाजी असे भस्म्या झाल्यासारखे खात सुटलो. शेवटी ती बाई येऊन म्हणाली
"बाळा भाजी संपली.."
"अजून काय आहे का खायला..?"
रस्स्यात घालायचे टॉमॅटो आहेत फक्त
"चालतील द्या.."
मग त्या टोमॅटोंवर तिने फोडणी घालून भाजी म्हणून दिली.
नंतर पोळ्यापण संपल्या.
"भात आहे ना..आणा तोच"
शेवटी भातपण संपला तेव्हा मात्र उठलो..आणि अत्यंत जडावलेल्या शरीराने एका घरगुती गेस्टहाऊसमध्ये अंग टाकून दिले....
क्रमश...